कापूरहोळ ( प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
भोर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे! मु.पो. कामथडी ता.भोर (हायवेलगत) येथे सुरू असलेली श्री स्वामी समर्थ राईस मिल आता शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे दुसरे नाव बनली आहे. आधुनिक यंत्रणेद्वारे भात भरडून करण्याची सुविधा, सर्वाधिक उतारा देण्याची हमी आणि पारदर्शक व्यवहार व शेतकऱ्यांचे पसंती व चांगला प्रतिसाद या मिलला मिळत आहे ,यामुळे या मिलकडे परिसरातील हजारो शेतकरी आकर्षित होत असल्याची माहिती प्रोप्रा. सागर इंगुळकर व मोहन नाक्ती व सहकाऱ्यांनी सांगितले आहे.
येथे भात भरडताना तांदूळ व कणी मधला खडा पूर्णपणे वेगळा होतो, तांदळाचा तुकडा अत्यंत कमी प्रमाणात राहतो, तसेच तांदूळ अधिक चमकदार, स्वच्छ आणि उच्च प्रतीचा तयार होतो. शेतकऱ्यांना घरबसल्या सोय व्हावी म्हणून भात आणण्यासाठी व तांदूळ पोहचवण्यासाठी मोफत गाडीची सुविधा उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांची गरज, वेळ आणि मेहनत यांची जाण ठेवणारी ही मिल सर्वांना गुणवत्तापूर्ण सेवा, योग्य वजन आणि सर्वाधिक उतारा देण्याची बांधिलकी जपत आहे. याशिवाय इंद्रायणी तांदूळ खरेदीची सुविधाही येथे उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांच्या मनातील एकच विश्वास —भात कुठेही भरडून मिळेल… पण खरा समाधानकारक दर्जा फक्त ‘श्री स्वामी समर्थ राईस मिल’मध्येच मिळेल!
प्रोप्रायटर :श्री सागर इंगुळकर, प्रमोद इंगुळकर, पराग इंगुळकर, महेश इंगुळकर, स्वप्नील (सोनबा) मोहिते, मोहन नाक्ती


