.जलत्याग मुळे हळूहळू उपोषणकर्त्यांची तब्बेत बिघडली
वर्धा ( प्रतिनिधी):-स्पेशल रिपोर्ट
राज्यभरातून शेकडों कर्मचाऱ्यांचा रोख वर्ध्याच्या दिशेने.. 4 थ्या दिवशी जलत्याग मुळे हळूहळू उपोषणकर्त्यांची तब्बेत बिघडत आहे.. येणारा एक एक क्षण काळजी करणारा आहे..
जुनी पेन्शनसाठी आमरण उपोषण वर्धा येथे 3 दिवसांपासून सुरू आहे. जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस , तरीदेखील याकडे डोळेझाक करणाऱ्या असंवेदनशील सरकार च्या निषेधार्थ आज 4 थ्या दिवसापासून जलत्याग करण्याचा निर्णय उपोषणकर्त्या आंदोलकांच्या वतीने घेण्यात आलेला असल्याचे दिसून आले.

