.......या दिवशी हॉटेल,ढाबे,खानावळी, चायनीज, पान टपरी इ. सर्व आस्थापना बंद राहणार......
पुणे (प्रतिनिधी)
मा. जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख पुणे यांनी खालीलप्रमाणे सक्त मनाई आदेश काढला आहे .विजयी मिरवणूक काढणे.रॅली काढणे,फटाके फोटणे गुलाल उधळणे, विना परवानगी फ्लेक्स/ बॅनर लावणे.वरीलप्रमाणे सक्त मनाई आदेश आहेत. तसेच दि 18 रात्री 10:00 ते दि 19 सकाळी 6:00 पर्यंत सर्व हॉटेल,ढाबे,खानावळी, चायनीज, पान टपरी इ. सर्व आस्थापना बंद राहतील,सदर आदेशाची अंमलबजावणी कडक केली जाणार आहे ,तरी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे , असे आवाहन राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी केले आहे.