छत्रपती संभाजीमहाराज यांना ३४१ व्या राज्याभिषेकदिनी मावळ्यांची मानवंदना.
पुणे : (प्रतिनिधी)
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या पानशेत रस्त्यावरील निगडे मोसे येथील शिवशंभु शिल्पसृष्टीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१ व्या राज्याभिषेक सोहळ्यात हर हर महादेव ,जय शंभू राजे च्या जयघोषात व पुष्पवृष्टी ,जलाभिषेकाने आज (१६) मावळ्यांनी मानवंदना दिली.
मावळा जवान संघटना व मोसे, सिंहगड खोरे मावळाच्या वतीने राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते. रायरेश्वराचे शिवशक्तीपाठाचे पुजारी सुनील जंगम यांच्या हस्ते पांरपारीक अभिषेक पुजा व आरती करण्यात आली. हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव जोरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे ,पर्यावरण तज्ञ डॉ. सचिन पुणेकर ,पराग शिळीमकर ,समीर घोडेकर ,लक्ष्मण दारवटकर, प्रा.नंदकुमार बारवकर ,श्रीकांत दारवटकर, अशोक पायगुडे, प्रशांत भोसले, तन्मय दारवटकर आदी उपस्थित होते. संयोजन रोहित नलावडे व संचित निवंगुणे यांनी केले.
दत्ताजी नलावडे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रखर राष्ट्रीय बाण्याची माहिती दिली ते म्हणाले शंभूराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनिय लोककल्याणकारी कार्यातुन स्वराज्याचा चौफेर विस्तार केला.
(छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण छत्रपती संभाजी महाराज यांनी आयुष्यभर अंगीकारून हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. शंभराजे अर्जिक्यवीर होते; तसेच प्रखर बुद्धिमान होते. शंभूराजे यांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ म्हणजे राष्ट्राचा बहुमोल ठेवा आहे. संभाजीमहाराज यांच्या बलिदानाने स्वातंत्र्याची नवीन क्रांती सुरू झाली.)