आमची मागणी मान्य करा, अन्यथा आमरण उपोषण करणार:- हरिश्चंद्री ग्रामस्थांचे जिल्ह्याधिकारी यांना निवेदन.

Maharashtra varta


 आमची मागणी मान्य करा, अन्यथा आमरण उपोषण करणार:- हरिश्चंद्री ग्रामस्थांचे जिल्ह्याधिकारी यांना निवेदन.



पुणे (प्रतिनिधी):-

 हरिश्चंद्री गावच्या फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर 26 जानेवारी 2021 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याबाबतचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना आज दि.19 रोजी  देण्यात आले आहे.


 मौजे हरिश्चंद्री ग्रामस्थांची 65 टक्के लोकांची शेती जमीन व गायरान राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे आहे. या आमच्या फाट्यावर भुयारी मार्ग होण्याबाबत वेळोवेळी मागणी करून देखील आज अखेरपर्यंत भुयारी मार्ग होणे बाबत कोणतीही दखल प्रशासनाने घेतली न गेल्यामुळे नाईलाजास्तव हरिश्चंद्री गावच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा हरिश्चंद्री गावाच्या मधून जात असल्याने येथे झालेल्या अपघातामुळे गावातील आठ ते नऊ कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले आहे ,त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी गावातील तरुणांनी 3/ 6/ 2019 रोजी तहसील कार्यालय भोर येथे व आजपर्यंत अनेक वेळा उपोषण केले. परंतु त्या ठिकाणी देखील प्रकल्प संचालक पुणे यांनी खोटे आश्वासन देऊन ग्रामस्थांचे दिशाभूल करून फसवणूक केली आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा हरिष्चंद्री गावाच्या मधूनच जात असल्याने गावातील दैनंदिन कामासाठी गावातील नागरिकांना रोज हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून  जावे लागते. गावातील ग्रामस्थांनी 21 जून 2019 रोजी जिल्हाधिकारी पुणे यांच्यासमोर स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे .तरी आज अखेर  सदर गोष्टींची कोणतीही दखल प्रशासनाकडून घेतली गेली नाही. म्हणून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी नाईलाजाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.


 यावेळेस हरिश्चंद्री गावचे सामाजिक कार्यकर्ते राम पाचकाळे यांनी बोलताना सांगितले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष होऊन देखील आमच्या गावाला मूलभूत गरज असणाऱ्या भुयारी रस्त्यासाठी जर इतका पाठपुरावा करून देखील भुयारी मार्ग मिळत नसेल ,तर आम्ही उघड्या डोळ्यांनी आमच्या घरातील लोकांची अपघातामुळे होणारी त्या पाहु शकत नाही, प्रशासनाने आमची योग्य ती दखल न घेतल्यामुळे हरिश्चंद्री ग्रामस्थांना रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे.


जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना दत्तात्रय बाठे उपसरपंच,राम पाचकाळे सामाजिक कार्यकर्ते,गणेश  गाडे, शशिकांत गाडे,अभिजित सकट प्रहार पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पुणे,सोनल चाकणकर प्रहार महिला आघाडी उपाध्यक्ष,मीनाताई धोत्रे प्रहार पुणे शहर अध्यक्ष,गणेश मराठे प्रहार सचिव,महेश चाकणकर दारूबंदी पुणे जिल्हा अध्यक्ष, संतोष मोहिते प्रहार भोर तालुका अध्यक्ष, विठ्ठल कोंडे भोर तालुका उपाध्यक्ष,सुरेश बागल भोर तालुका कार्याध्यक्ष.आदी उपस्थित होते.

To Top