केतकावणे मांगदरीची 25 वर्षाची बिनविरोधची परंपरा कायम.

Maharashtra varta

 केतकावणे मांगदरीची 25 वर्षाची बिनविरोधची परंपरा कायम.

 


वेल्हे ( प्रतिनिधी)

वेल्हे तालुक्यातील मांगदरी केतकावणे ग्रामपंचायतीचे सातही सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. तालुकाध्यक्ष तानाजीबापू मांगडे यांच्यासह ग्रामस्थांच्या प्रयत्नाने बिनविरोध अखंड पंचवीस वर्षांची परंपरा कायम ठेवण्यात या गावाला यश आले आहे.


 मांगदरी केतकावणे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीत या वेळी नेहमीप्रमाणे सर्वांची एकजूट दाखवत सामंजस्याचे विचार ठेवत निवडणूक बिनविरोध केलेली आहे.ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांमध्ये मा. सरपंच सागर तानाजी मांगडे, नितीन मांगडे तानाजी जानकर ,प्रियंका सागर मांगडे ,वैजंता मोझर ,आशा राजगुरू ,वैशाली चेतन मांगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या बिन विरोध निवडणुकीसाठी तानाजी मांगडे, सुनील मोझर, डॉ. संभाजी मांगडे ,शंकर मरळ ,बाळासाहेब मळेकर विनायक देशपांडे ,दशरथ पठारे व दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले .


तानाजी बापू मांगडे यांनी न्यूज वार्ता शी बोलताना सांगितले की, वेल्हे तालुक्यातील आदर्श व प्रेरणादायी असणारे मांगदरी व केतकावणे ही गावे आहेत.गेली पंचवीस वर्ष गावची निवडणूक बिनविरोध करत आहोत. त्यामुळे गावांमध्ये एकी,व एकजूट आहे.अनेक विकास कामे येथे  मार्गी लागलेली आहेत.वेल्हे तालुक्यातील आदर्श विकासाचे गाव म्हणून मांगदरी व केतकावणे विकसित करणार असल्याचे सांगितले.

To Top