देशाच्या समृद्धीसाठी शिक्षकच दिशादर्शक:-चांगदेव नाना मसुरकर.
आळंदे केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश
आवाळे यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार.
भोर (प्रतिनिधी) :
शिक्षकी पेशातला माणूस हा समाजातला आदर्श नागरिक असतो. समाजाची शिक्षकांप्रति कार्याची वेगळी मोजपट्टी आहे. शिक्षकीपेशा सर्व क्षेत्रात पवित्र मानला जातो, मात्र त्याचे पावित्र्य जोपासण्यासाठीची जबाबदारी सध्याच्या शिक्षकांची आहे. सेवानिवृत्तीनंतर वेळ मिळेल तेव्हा लिखाण व मार्गदर्शन करण्याचे आवाहन चांगदेव नाना मसुरकर यांनी केले.
आळंदे केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश आवाळे हे 31 डिसेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त झाल्याने आळंदे केंद्राच्या वतीने तथा , मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या माध्यमातून सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणा प्रसंगी शिक्षक नेते चांगदेव नाना मसुरकर बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून कमलाकर मोहिते उपस्थित होते.
आळंदे केंद्र अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सेवापुर्तीनिमित्त केंद्रप्रमुख सुरेश आवाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
गेली तीन दशकाहून अधिक काळ भोर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात शिक्षक ,पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख म्हणून सुरेश आवाळे यांनी उत्कृष्ट कामकाज केले.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यात व व समाज विकास साधण्याचं प्रभावी काम त्यांनी केले आहे.
यावेळी शिक्षक संघटनेचे दत्तात्रय पांगारे,शंकर दलवाई ,संदीप आप्पा जगताप, ,मंदाकिनी चाचर,विष्णू बाठे ,संजय बरकडे,पंढरीनाथ धावले आदी व इतर मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
"न्यूज वार्ता"शी बोलताना केन्द्र प्रमुख सुरेश आवाळे म्हणाले की,
"काय बोलू आता...
कैसा होऊ उतराई...
माझ्या सर्व शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख बंधू भगिनींना..सप्रेम नमस्कार, पुणे जिल्ह्यातील, भोर तालुक्यातील, आळंदे केंद्रप्रमुख पदावरून आपल्या सर्वांचा निरोप घेताना मनात भावनांचा प्रचंड कल्लोळ उठला आहे.भोर तालुक्यामध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असतात.या ठिकाणी काम करताना आपण सर्वांनी जे अनमोल सहकार्य केले त्यातून उतराई होणे केवळ अशक्य. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझ्या परीने प्रयत्न करताना आपण सर्वांनी जी अनमोल सहकार्याची साथ दिलीत त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपणा सर्वांचा निरोप घेताना मन भरून आले आहे,मात्र आपल्याशी जोडले गेलेले नाते सदैव जपण्याचा मानस आहे.